Tuesday, January 19, 2010

Monday, December 14, 2009

पुस्तकात नसलेली पानं.......!!!!!!!

आज जीवन जगत असताना प्रत्येक जण स्वार्थ पाहतोय । कुणालाही मदत न करने हा त्यांचा स्वभाव गुण धर्म असतो । 'मी ' पणा त्यांच्या अंगात भिनलेला असतो ... मी ..माझा ...माझे... यातच यांचे जीवन संपत असते । आईने दिलेल्या संस्काराला जो तो विसरत चाललेला आहे ...माध्यमामुले जग जवळ येत आहे तरी पण आपण मात्र विचाराने, संस्कराने ,आचरराने दूर जात आहोत की काय ?हा प्रश्न पडतो । उपकार नावाची चीज कुणाकडेच दिसत नाही...समान पातलीवर राहू नये असे कोणत्याच पुस्तकात नसलेली पानं ....लोक का वाचत असतात .हा प्रश्न पडतो .

सत्तेची रास

छोट्या-छोट्या राज्याची प्रत्येकालाच आस ।
कांग्रेसला वाटायची आहे सत्तेची रास ।
अखंडित भारताचा कोणाला आहे ध्यास ।
जो तो सोकला वैयक्तिक स्वार्थास।

Thursday, November 26, 2009

भारतीय संविधान दिन चिरावु होवो .....!!!

आज सकाळी कोल्हापुरातील प्रसिद्ध दसरा चौका मध्ये गेलो होतो .तेथे भारतीय संविधान दिन साजरा होत होता .छत्रपति शाहू महाराजांच्या पुतल्यास पुष्पहार घालण्यात आले . त्यानंतर सरनाम्यांचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत वाचन करण्यात आले .२६/११ मध्ये शहिद झालेल्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .ह्या दोन्ही घटना पाहिल्यानंतर काही प्रश्न समोर उभे रहात होते .आपण घटनेतील प्रत्येक कलमांची अंमलबजावणी करतो का? दहशतवाद का?फोफावतोय याचा विचार कधी आपण करत नाही.या विचारात असताना एक निमभिकारी आमदारांच्या कड़े जावून हात पसरतो .परन्तु त्याकडे लक्ष न देता आमदार पुढे सरकतात .सामाजिक न्यायाच्या दिशेने जाणारे संविधान आपण सर्व सामान्यांकडे नेण्यास का कमी पडत आहोत .याचा ही विचार करणे गरजेचे आहे .संविधान हे सर्व सामान्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचे माध्यम आहे .जे असुरक्षित आहेत. ते इतराना स्वस्थ बसु देणार नाहीत .त्यासाठी सर्वांची विकासाभिमुख हिताची जोपासना केलीतरच भारतीय संविधान दिन साजरा केल्याचे समाधान वाटेल ....!!!

Monday, November 23, 2009

पदरा आडच जीण.........!!!!!!

आईच्या पदरा आड़ आपण लहानाचे मोठे होत असतो ........तिथेच खरेतर चांगले संस्कार घडत असतात ......त्याच शिदोरीवर आयुष्यभर ..... जीवन जगत असतो .....हे संस्कार कोणतीही चुक करू देत नाहीत ........परंतु .....स्वार्थ असल्यास काही लोक हे..... संस्कार विसरायला लागतात .....आणि कुणाच्यातरी फायद्यासाठीं त्यांच्याच पदराला धरून जाणारे ......काही जन असतात .....हे जीण तसं गुलामिचच असते .....जे गुलाम असतात ...... त्याना सुद्धा वाटत असते ...की... आपलाही पदर कोणी ...तरी धरला पाहिजे .....मग ...ते आपल्या हाताखालीं काही जन ......मजबुरे वाले घेत असतात .....येथूनच खरे तर माणूस .....संस्कारहीन.... होत जातो ......त्याला समाजाचे हित ..न ..दिसता स्वहितच ...दिसत असते ........म्हणून वाटते....... ,आईच्या पदरा आडचे जिणे लाख मोलाचे असते .......!!!!

कशासाठी ......?

नुकताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी आयबीएन लोकमत वर भ्याड हल्ला केला .तो हल्ला संविधान अन्वये अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला होता .या शिवसेनेची मान्यता निवडणूक आयोगाने काढून घ्यावी. कारण त्यांनी अतिरेकी संघटने प्रमाणे हल्लाची जबाबदारी स्वीकारली आहे .

Thursday, November 12, 2009

राजकारणातील गणिताचं सूत्र ......!!!!!

ते स्वत:च्या फायद्यासाठी

करतात बेरजेचे राजकारण

फायदा झाल्या नंतर

दुसरयाकडे दिसताच

ते करतात वजाबाकीच राजकारण

स्वत:च 'कौतुक' करून घेण्यासाठी

घेतात हाताखाली मग हातातलेच

येतात काखेखाली

मग सुरु होतं गुनाकाराच राजकारण

जो आपल्या fअयाद्याचा नाही

मग त्याच्या बरोबर करत राहतात

भागाकराच राजकारण गोटा तल्या माणसांना

घालतात महिरापी कंसात

परन्तु त्याना तरी कुठं

शिकवतात सगलेच डाव

मग जेंव्हा शिश्यच करतात

गुरु वर कुरघोडी

तेव्हां मात्र एक हछः

असतो त्यांच्याकडे

तो मात्र शाहान्याला दिसतो

मग इथुनच सुरु होत

राजकरनातील गनिताच सूत्र ........!!!!!!